वरुण राजाला आर्णव; नजरा लागल्या आभाळाकडे
शब्दसंदेश न्यूज देवरी, २१ जून
रात्रंदिवस कबाड कष्ट करून शेतकरी शेतात राबराब राबतो. त्याच्या घामाच्या धाराचे मोती होतात तेव्हा कुठे धान्य हाती लागते. गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाची अवकृपा होत असल्याने शेती उत्पादनात सातत्याने घट होत आहे. वर्षभर मेहनत करूनही कुटुंबीयांना घास भरवणे कठीण होत आहे. पाचवीलाच पुजलेली संकटे झलक मोठ्या हिमतीने बळीराजा नव्या हंगामासाठी तयार असून यंदा तरी निसर्ग वरून राजा प्रसन्न व्हावा म्हणून "भरू दे यंदा मृगाच आभाळ, नावाचा तुझ्या गजर करीन!!"अशा अपेक्षेचे साकडे बळीराजा देवाजवळ घालीत आहे.
जिल्ह्यात सिंचन क्षेत्राची वाणवा आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पावसाळा अवलंबून आहेत. मागील अनेक वर्षापासून निसर्गाच्या समतोल दिवसेंदिवस बिगडत चालला आहे. मान्सूनचे चाहूल लागली असून बळीराजा पूर्व पावसाळी कामात गुंतला आहे. यंदा बियाण्याच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंतित आहेत. उसनवारी करून खरीप लागवटीच्या तयारीत आहेत.
मृग नक्षत्र लागून आठवठा उलटला तरी दमदार पावसाची सर जमिनीवर आली नाही. त्याऐवजी वाढलेल्या तापमानाने बाष्पयुक्त वातावरणात उकाड्याचे तीव्रता त्रास देत असून अस्वस्थता वाढली आहे.